सर्व प्राणीमात्रांच्या स्थैर्य, उन्नती, प्रगती व शांती करिता सतत सेवाकार्यात कार्यशील राहणे. ही सेवा एका विशिष्ट जातीधर्मासाठी नसून अखंड मानवतेसाठी आहे. भारतातील दुर्गमातील दुर्गम खेड्यापाड्यांपासून अगदी शहरी भागातील गरीब, गरजू, दीनदुबळया लोकांची तसेच प्राण्यांची विनाशुल्क वेगवेगळ्या प्रकारची सेवा अविरतपणे सुरु ठेवणे.